back to top
Sunday, June 1, 2025
14.4 C
London
Home Blog

Gadchiroli : माओवादी कमांडर नागसु तुमरेटीचं आवाहन: ‘शस्त्र खाली ठेवा, सरकारसोबत चर्चा करा

Gadchiroli Naxal गडचिरोली : संपूर्ण भारतात एकही स्थान तुमच्यासाठी सुरक्षित नाही, अबुझमाडचा गड ढासळला आहे. गपगुमान शस्त्र खाली ठेवा, आत्मसमर्पण करा आणि आमच्यासारखं सन्मानाने जगा. असा सल्ला दिला आहे तो मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या माओवादी कमांडर नागसु तुमरेटीने. एबीपी माझाच्या माध्यमातून जंगलात अजून ही लढण्यास उत्सुक असलेल्या उरलेल्या माओवाद्यांना (Narayanapur Naxal Encounter)  तुमरेटीने हा सुचक सल्ला दिला आहे. माओवाद्यांचा (Naxal) सर्वोच्च नेता नंबाला केशव राव मारला गेल्यानंतर माओवाद्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून नक्षलवादी चळवळ खिळखिळी  झाल्याचे बोललं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आत्मसमर्पण करणाऱ्या माओवादी तुमरेटीने यांच मुद्यांवर बोट ठेवत भाष्य केलंय. 

शस्त्र खाली ठेवून सरकारसोबत चर्चा करावी

संपूर्ण भारतात एकही स्थान आता माओवाद्यांसाठी सुरक्षित नाही. माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेला अबूझमाडचा जंगल ही आता त्यांच्यासाठी सुरक्षित गड राहिलेला नाही. तिथेच शिरून माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसव राजूला सुरक्षा दलांनी मारले आहे. त्यामुळे माओवाद्यांच्या उरलेल्या नेतृत्वाने परिस्थितीची जाणीव ठेवावी आणि शस्त्र खाली ठेवून सरकारसोबत चर्चा करावी, असा सुचक सल्ला आत्मसमर्पण केलेल्या माओवादी कमांडर तुमरेटीने दिला आहे. त्यामुळे माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नम्बाला केशवराव उर्फ बसव राजूचा मारलं जाणं, माओवादी चळवळीचा कणा पूर्णपणे मोडणारी घटना ठरल्याचे दिसून येत आहे.

माओवाद्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवून योग्य निर्णय घ्यावा

माओवाद्यांकडे आता शस्त्र आणि दारूगोळा राहिलेला नाही, सुरक्षा दलांशी एन्काऊंटर झाल्यास माओवादी जास्त वेळ लढा देऊ शकत नाही. जेव्हा माओवाद्यांची एक पूर्ण कंपनी त्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव रावची सुरक्षा करू शकली नाही, तर कोणता ही माओवादी सुरक्षित नाही, हे समजून घ्यावे आणि आमच्यासारखं आत्मसमर्पण करून सन्मानाचा जीवन जगावं, असा सूचक सल्ला नागसू तुमरेटी उर्फ गिरधर या आत्मसमर्पण केलेल्या माओवादी कमांडरने त्याच्या जंगलातील सहकाऱ्यांना दिला आहे. आता नवीन तरुण माओवाद्यांच्या दलम मध्ये सहभागी होत नाही, जनतेचा पाठिंबा माओवाद्यांना मिळत नाही, अशा स्थितीत माओवाद्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवून योग्य निर्णय घ्यावा, असं ही नागसु तुमरेटी म्हणाला.

शांतता वार्तेचे प्रस्ताव देताना किमान शस्त्र खाली ठेवले पाहिजे 

1980 मध्ये माओवाद सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच सुरक्षा दल जनरल सेक्रेटरीपर्यंत पोहोचले असून त्याला मारले आहे.  अशावेळी माओवाद्यांनी शांतता वार्तेचे प्रस्ताव देताना आणि किमान शस्त्र खाली ठेवले पाहिजे. हातात शस्त्र घेऊन चर्चा करण्यात कुठलाही अर्थ नाही, असं ही तुमरेटी म्हणाला. एका बाजूला शस्त्र संधीचा प्रस्ताव द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला हातात शस्त्र घेऊन सुरक्षा दलांशी लढा ही द्यायचं यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीव जात आहे, रक्तरंजित वातावरण झाले आहे, त्यामुळे उरलेल्या नक्षल कमांडरसनी योग्य निर्णय घ्यावा, असा सल्ला ही त्याने दिला आहे.

Vidarbha Rain News update : विदर्भात पावसाचा जोर; पूर्णा नदी मे महिन्यातच प्रवाहित, नागरिक आनंदित

Vidarbha Rain News : राज्यातील अनेक भागात दमदार पावसाने  (Monsoon) हजेरी लावत सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. या पावसानं अनेक शहरातील जनजीवन विस्कळीत केलं आहे. अशातच या पावसाचा फटका विदर्भातील (Vidarbha) अनेक जिल्ह्याला बसला असून नदी, नाले आणि सखोल भागात पाणीच पाणी झाले आहे. तर आज (28 मे)विदर्भातील वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती चंद्रपूरसह जवळ जवळ सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. 

 दरम्यान, पश्चिम विदर्भाची जीवन वाहिनी समजली जाणारी पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित झाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात बरसत असलेल्या पावसाने पूर्णा नदीला आज मोठा पूर आला आहे. मे महिन्यातच पूर्णा नदी प्रवाहित झाल्याने परिसरातील नागरिक आनंदित आहेत.

वीज कोसळल्याने चार जणांचा मृत्यू, तर पाच जण जखमी

विदर्भात पावसाने कहर केला असून अनेकांचे यात मोठं नुकसान झालं आहे. तर वेगवेगळ्या घटनांमध्ये अंगावर वीज कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झालाय तर पाच जण जखमी झाले आहेत. यात पहिल्या घटनेत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात कालीमाटी परिसरात शेतात काम करणाऱ्या सतीश फुंडे या शेतकऱ्याचा वीज कोसळल्यामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत चंद्रपूर जिल्ह्यात मारडा गावात वीज कोसळून एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाले आहे. या घटनेत पांदण रस्त्याचे काम सुरू असताना ट्रॅक्टर वर वीज कोसळली. पावसावेळी ट्रॅक्टरच्या आश्रयाने बसलेल्या आनंदराव वायरे यांचा मृत्यू झालाय. तर त्यांचे तीन सहकारी जखमी झाले आहे.

भंडारा जिल्ह्यातील खांबडी शिवारात हार्वेस्टरच्या माध्यमातून भात पीक कापणी सुरू असताना वीज कोसळल्याने एक महिला आणि हार्वेस्टर चालकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोघे मजूर जखमी झाले आहेत. कांता जीभकाटे आणि विजय सिंह अशी मृतांची नावे आहेत.

बळीराजाला कृषी विद्यापीठाचा महत्वपूर्ण सल्ला

‘आपत्तीतून इष्टापत्ती’ अशी आपल्या मराठीत म्हण आहे. सध्या राज्यभरात सुरू असलेला धुवाधार मान्सूनपूर्व पावसासाठी ही म्हण तंतोतंत खरी ठरतांना दिसतीये. सध्या राज्यात सुरू असलेला मान्सूनपूर्व पाऊस हा खरिपासाठी अतिशय पोषक असल्याचं मत अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं व्यक्त केलंय. या पावसाचा खरिपातील पिकांसाठीच्या तण नियंत्रणासाठी मोठा फायदा होणार असल्याचं विद्यापीठानं म्हटलंय. सध्याच शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करण्याचं आवाहन विद्यापीठाने केलंय. हा पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी राहिलेली मशागतीची कामे पूर्ण करावी असा सल्ला कृषी विद्यापीठाने दिलाय. या पावसामुळे जमीन अधिक भुसभुशीत झाल्याने त्याचा फायदा मशागतीसाठी होणार असल्याचं विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी म्हटलंय. या पावसाचा फायदा भविष्यातील तण नियंत्रणासोबतच लागवडीनंतरच्या उगवणक्षमता वाढीसाठी होणार असल्याचं कुलगुरू डॉ. गडाख म्हणालेत.

Yavatmal : यवतमाळमध्ये मतिमंद महिलेवर अमानुष अत्याचार; रस्ता विचारण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून कृत्य

Yavatmal Crime News: पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेचा छळ करुन तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे प्रकरण राज्यभरात गाजत असतानाच  यवतमाळमधून (Yavatmal News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्ता विचारण्याच्या बहाण्याने मतिमंद महिलेला बळजबरीने गाडीत बसवलं, नंतर गाडीतील एका अज्ञात नराधमाकडून गाडीतच नको ते कृत्य करत अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. सोबतच या घटनेची माहिती कुणाला सांगितलेस तर जिवानिशी ठार करील, अशी धमकीही या आरोपीकडून देण्यात आली आहे. ही घटना उजेडात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे. मात्र या  घटनेनं यवतमाळ शहर हादरलंय.  

‘कुणाला सांगितलस तर जिवानिशी ठार मारीन’

पुढे आलेल्या माहितीनुसार, रस्ता विचारण्याच्या बहाण्याने गाडी थांबविली, पत्ता सांगितल्या नंतर मी तिकडेच चाललो असे सांगून मी तुला घरी सोडतो असे म्हणत जबरदस्तीने मतिमंद महिलेला गाडीत बसवलं. त्यानंतर वनवासी मारुती ते जगदंबा कॉलेज परिसरात मतिमंद महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वैद्यनगर परिसरात राहणाऱ्या महिलेला ही बाब कुणाला सांगितलीस, तर जीवे मारीन, अशी धमकी देऊन माई हॉटेलजवळ सोडून तो पसार झाला.

 ‘त्या’ पांढऱ्या रंगाच्या गाडीचा शोध सुरू

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर भयभीत अवस्थेत घरी परतल्यानंतर तरुणीने आई आणि काकूला घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकुण कुटुंबियांना जबर धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून पांढऱ्या रंगाच्या गाडीचा शोध सुरू केला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची शोध मोहिम सुरु केली.

भंडाऱ्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू, तर शेतात काम करणारे दोन गंभीर

भंडारा जिल्ह्यात दुपारनंतर सर्वत्र पावसानं जोरदार हजेरी लावली. मेघगर्जनेसह आलेल्या पावसात शेतात हार्वेस्टर मशीनच्या माध्यमातून भातपीक कापणी सुरू असताना वीज कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झाला. तर, अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील खांबडी शेतशिवारात सायंकाळी घडली. मृतकात एका महिलेसह हार्वेस्टर चालकाचा समावेश आहे. तर, दोन्ही जखमी है शेतमजूर आणि हार्वेस्टर वरील कामगार बसून दोघांवर सध्या अड्याळ येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. कांता जीभकाटे (५५) आणि विजय सिंग (४०) असं मृतकांचं नावं आहे. तर, संजय गाडेकर (४७) आणि महेश तेजासिंग (३०) असं गंभीर जखमी असलेल्यांची नावं आहेत. मृतक विजय सिंग आणि जखमी महेश तेजासिंग हे दोघेही उत्तर प्रदेशातील मथुरा येथील असून या भागात ते हार्वेस्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतातील भातपिकाची कापणी आणि मळणी करण्याचं काम मागील काही दिवसांपासून करीत होते.

भाजप आमदार परिणय फुके यांच्यावर प्रिया फुके यांचे गंभीर आरोप: धमक्या, फसवणूक आणि अन्यायाचा आरोप

Parinay Fuke Nagpur News: भाजपचे आमदार परिणय फुके यांच्याकडून गुंडाकरवी मला दररोज धमकावले जात आहे. मी दररोज पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. मी याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही दाद मागितली होती. परंतु, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही मला ‘बघतो बघतो’ सांगण्यापलीकडे कोणतीही मदत केली नाही, असा गंभीर आरोप परियण फुके (Parinay Fuke) यांचे दिवंगत बंधू संकेत फुके यांच्या पत्नीने केला आहे. संकेत फुके यांच्या पत्नी प्रिया फुके बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे उपस्थित होत्या. या पत्रकार  परिषदेत प्रिया फुके यांची परिणय फुके यांच्यावर गंभीर आरोप केले. (Nagpur Crime news)

मी माझा लाडक्या भावांना मदत मागितली, पण मला मदत मिळाली नाही, माझा सोबत उभं राहायला कोणी उभं राहिलं नाही. संकेत फुके यांच्यासोबत माझं 2012 मध्ये लग्न झाले. लग्नानंतर संकेत फुके (Sanket Phuke) यांना आजार झाला होता. त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही झाली होती. माझी फसवणूक करुन हे लग्न झाले होते. माझ्या पतीला घेऊन आम्ही उपचारासाठी मुंबईला आलो होते. 2022 साली त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मी घरात माझ्या पतीचा पैशांचा कारभार, त्यांच्या मालमत्तेविषयी प्रश्न विचारले. तेव्हा ‘तू कोण आहेत?’, ‘तुला हे विचारण्याचा काय हक्क आहे?’ असे विचारत मला रात्री 10 वाजता घराबाहेर काढण्यात आले. त्यानंतर मला जीवे मारुन टाकण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. तू काही बोललीस तर तुझ्या कुटुंबाला मारुन टाकू, असे मला धमकावण्यात आले. मला दोन लहान मुलं आहेत. मी गेल्या दीड वर्षांपासून आईच्या घरी राहत आहे.

माझा हक्क मिळवण्यासाठी रोज पोलीस ठाण्यात चकरा मारत आहे. मला मारण्यासाठी अनेकदा गुंड येतात, त्यांच्या बॅगेत जड वस्तू असतात. आताही पत्रकार परिषदेला येतान माझ्या मागे दोन माणसं होती, ती कोण होती, हे मला माहिती नाही. माझ्यावर अॅट्रोसिटी, खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आजी-आजोबांनी कोर्टात केस करुन माझ्या मुलांची कस्टडी मागितली आहे. मुलांची आई जिवंत असताना ते कस्टडी कशी मागू शकतात? मी हक्क मागतेय माझा, मी कोणताही त्रास दिला नाही. मात्र, काहीतरी करुन आम्हाला दाबायचा प्रयत्न होत आहे, असा आरोप प्रिया फुके यांनी केला.

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनीही मदत केली नाही, प्रिया फुकेंचा आरोप

मी या सगळ्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटले होते. त्यांना संपत्तीत आमचा हक्क असल्याची कागदपत्रं दिली होती. पण देवेंद्र फडणवीसांना आजपर्यंत कधीही हस्तक्षेप केला नाही. बघतो, बघतो, असे ते दरवेळी सांगत राहिले. मी त्यांना मेसेजही केले होते. मी त्यांना प्रत्यक्षात चारवेळा भेटून ही परिस्थिती सांगितली आहे. त्यांना सगळं माहिती असूनही ते काही करत नाहीत. मी महिला आयोगाकडे 2024 साली याविरोधात तक्रार केली होती. पण महिला आयोगानेही मला मदत केली नाही, असे प्रिया फुके यांनी म्हटले. मला दोन लहान मुलं आहेत. पोलीस ठाण्यात मला सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत बसवून ठेवले जाते, असाही आरोप त्यांनी केला.

मला धमक्या दिल्या जातात की, न्यायव्यवस्था, पोलीस आणि प्रशासन आमच्या खिशात आहे. तुझा आवाज कधीच लोकांपर्यंत पोहोचणार नाही. 20 वर्षे गेली तरी तुझी केस कोर्टात येणार नाही, असे अगतिक उद्गार प्रिया फुके यांनी पत्रकार परिषदेत काढले.

Sushma Andhare: पोलीस यंत्रणा प्रिया फुके यांच्याविरोधात: सुषमा अंधारे

पोलिसांची भूमिका ही प्रिया फुके यांच्याविरोधात राहिली आहे. प्रिया फुके यांनी आरोपाचे  पुरावे सादर करा, असा समन्स वारंवार पोलीस पाठवतात. त्यामुळे आम्ही पत्रकार परिषदेत सर्व पुरावे सादर केले. प्रिया फुके यांच्या विनयभंगाची तक्रार घेतली नाही. मात्र आरोपीच्या तक्रारीवरून अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला.  प्रिया फुके या लढाईत एकटी पडली होती. त्यामुळे आम्ही तिच्यासोबत उभे आहोत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर: अंगावर मारहाणीच्या 29 खुणा, यातील 6 खुणा ताज्या असल्याचे उघड

पुण्यातील वैष्णवी शशांक हगवणे हुंडाबळी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणेचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आता समोर आला असून यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. वैष्णवीने आत्महत्या केली त्या दिवशी देखील तिचा शारीरिक छळ झाला असल्या

सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासला कंटाळून वैष्णवी हगवणे हीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे दोषी आहेत. तसेच दीर आणि सासर्‍याला देखील अटक करण्यात आली आहे. या सर्वांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणी तिचा पती, सासू आणि नणंद यांना पोलिसांनी सुरुवातीलाच अटक केली होती. तर सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे हे दोघेही 17 मेपासून फरार होते. 22 मे रोजी पहाटे पोलिसांनी त्यांना अटक केली. सर्व आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत.

आरोपींना मदत करणाऱ्या पाच जणांना अटक

आरोपी राजेंद्र आणि सुशील हगवणे हे अटक टाळण्यासाठी 17 मे ते 22 मे या पाच दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होते. या काळात त्यांना आश्रय व मदत करणाऱ्या पाच जणांविरोधात पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्यातून पलायन केलेल्या या दोघांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास या आरोपींनी मदत केली होती.

आरोपींमध्ये माजी मंत्र्याच्या मुलाचाही समावेश

मोहन उर्फ बंदू उत्तम भेगडे (वय 60, रा. वडगाव मावळ), बंदू लक्ष्मण फाटक (वय 55, रा. लोणावळा), अमोल विजय जाधव (वय 35, रा. पुसगाव, ता. खटाव, जि. सातारा), राहुल दशरथ जाधव (वय 45, रा. पुसगाव, ता. खटाव, जि. सातारा), प्रितम वीरकुमार पाटील (वय 47, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) अशी आरोपींची नावे आहेत. प्रितम पाटील हे कर्नाटकातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचे सुपुत्र आहेत. वीरकुमार पाटील यांनी सलग 28 वर्षे आमदार राहिले असून, आपल्या कार्यकाळात ते ऊर्जा मंत्री देखील होते.

मोहन भेगडे हा हगवणेंचा मित्र आहे. मोहन बंडू फाटक हा पवना डॅम जवळील फार्म हाऊसचा मालक आहे. अमोल जाधव आणि राहुल जाधव यांनी सातारा जिल्ह्यातील पुसेगावमध्ये हगवणे पिता पुत्रांना फार्म हाऊसवर आसरा दिला होता. तर प्रितम वीरकुमार पाटील याने कर्नाटकातील कोगनोळी या ठिकाणी हगवणे पिता पुत्रांना आसरा दिला होता.

.

Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या मुलावर गंभीर आरोप: विवाहितेची मानसिक व शारीरिक छळ केल्याचा ठपका; पीडितेने बजावली कायदेशीर नोटीस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने शारीरिक व मानसिक छळाचे गंभीर आरोप केलेत. या प्रकरणी पीडितेने सिद्धांत यांना कायदेशीर

दरम्यान, दिव्य मराठी डिजिटलने या प्रकरणी सिद्धांत शिरसाट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या नोटीशीची आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे सांगत आपले हात वर केले.

पीडित महिलेचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धांत शिरसाट यांनी चेबूर येथील त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या फ्लॅटमध्ये पीडित महिलेशी लग्न केले. दोन वर्षे ते चांगले राहिले. पण नंतर तिसऱ्याच मुलीशी त्यांचे अफेअर सुरू झाले. यामुळे त्यांनी पीडितेकडे दुर्लक्ष करत तिचा मानसिक छळ सुरू केला. तिने कुठे तक्रार दाखल करू नये म्हणून सिद्धांत शिरसाटने स्वत:च्या डोक्याला बंदूक लावत तिला धमकावले.

सिद्धांत शिरसाटने पीडितेला छत्रपती संभाजीनगरलाही येऊ दिले नाही. तू तिकडे आलीस तर तुझे तगडे तोडू अशी धमकी त्यांनी तिला दिली. त्यामुळे आम्ही त्यांना यासंबंधी नोटीस पाठवून पीडितेला 7 दिवसांच्या आत नांदण्यास घेऊन जाण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी पीडितेला नांदण्यास नेले नाही तर आम्ही महिला अत्याचार प्रतिबंधक काद्यांतर्गत त्यांच्यावर 3 केस दाखल करणार आहोत.

आता पाहू काय आहे नेमके प्रकरण?

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. सदर महिलेने सिद्धोांत यांना कायदेशीर नोटीस बजावून त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची 2018 मध्ये सोशल मीडियावरून सिद्धांत शिरसाट यांच्याशी ओळख झाली. काही दिवसांतच हे नाते चेंबूर येथील एका फ्लॅटमध्ये शारीरिक संबंधांपर्यंत पोहोचले. या संबंधानंतर सिद्धांतने आत्महत्येच्या धमक्या देत तिला भावनिक ब्लॅकमेल केले. त्याचबरोबर लग्नासाठी दबाव आणला. महिलेच्या म्हणण्यानुसार, सिद्धांतच्या सततच्या भावनिक आश्वासनांवर विश्वास ठेवून तिने त्याच्याशी विवाह केला. मात्र या नात्याचा शेवटही वेदनादायक ठरला. महिलेला गर्भधारणाही झाली होती, पण सिद्धांतने जबरदस्तीने तिचा गर्भपात करवून घेतल्याचा उल्लेख तिने नोटीसीमध्ये केला आहे. संजय शिरसाट हे राज्याचे सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री आहेत. त्यामुळे पोलिसांनी अद्याप या प्रकरणी कोणतीही कारवाई न करता हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

फडणवीस शिरसाटांचा राजीनामा घेण्याची तत्परता दाखवणार का? -सुषमा अंधारे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारे गुन्हेगारीला प्रोत्साहन दिले जात असेल किंवा लोकप्रतिनिधी अशा प्रकारे सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर लेकीबाळीवर हात टाकत असतील तर ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. भाजपने संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी जी तत्परता दाखवली होती. ती शिरसाट यांच्या राजीनाम्यासाठी दाखवली जाणार का? आपल्या बापाच्या सत्तेचा गैरफायदा घेत हे प्रकरण दाबण्याचा आणि त्या महिलेवर अन्याय करण्याची जी ताकद आहे, ती सत्तेतून आली आहे. त्यामुळे फडणवीस ही सत्ता काढून घेण्याची हिंमत दाखवणार का? हा खरा प्रश्न आहे, असे अंधारे यांनी म्हटले आहे. मी पीडितेची भेट घेऊन हा मुद्दा लावून धरणार असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

कठोर कारवाई होणे गरजेचे- अंबादास दानवे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. एका महिलेवर अन्याय होत असेल आणि तिने तशी तक्रार केली असेल, तर त्यावर रीतसर कारवाई होणे आवश्यक आहे. राजकीय दबावापोटी तक्रारीकडे दुर्लक्ष करून गुन्हा न दाखल करून घेणे हे चुकीचे आहे. त्यामुळे संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

खाली सिद्धांत शिरसाट यांना मिळालेली नोटीस वाचा जशीस तशी

माझे पक्षकार जान्हव्ही सिरसाठ व आपली ओळख मोबाईल, व्हॉटसअप, फेसबुक व इंस्टाग्रामद्वारे सन 2018 मध्ये झाली, त्यानंतर आपल्या संमंतीवर व आपल्या प्रतिसादामुळे वारंवार मोबाईल संपर्क व व्हॉटसअप, फेसबुक व इंस्टाग्राम अॅप वर मोबाईल होत गेला. असे की, माझे पक्षकार व आपली प्रत्यक्ष भेट आपल्या सिंधी सोसायटी, चेंबूर मुंबई येथील Flat वर झाली व त्यांनतर तुमच्या दोघांमध्ये वारंवार भेटी झाल्या दरम्यान तुमच्या दोघांमध्ये शारिरिक संबंध प्रस्तापित झाले व आपण स्वतःमाझे पक्षकारास लग्न करण्यासाठी हातावर, शरीरावर ब्लेडने जखमा करुन लग्नासाठी इमोशनली ब्लॅकमेल करीत असत. दरम्यान आपण माझे पक्षकारास तु माझया सोबत आताच लग्न कर नाहीतर मी आत्महत्या करुन घेईन तसेच हातावर ब्लेडने जखमाकरून त्याचे फोटो माझे पक्षकाराचे मोबाईल व इंस्टाग्रामवर आपण शेअर केले आहे, तसेच आपण स्वत;च्या डोक्याला पिस्तुल लावून मी गोळी मारुन घेईन व जिव देईन अशी धमकी देउन माझे पक्षकारास मानसिक त्रास दिला तसेच आपण डोक्याला पिस्तुल लावलेला फोटो माझे पक्षकाराचे फेसबुक व व्हॉटसअप वर पाठविला आहे ते सर्व फोटो माझे पक्षकाराकडे आहेत.

  • सततच्या लग्नाच्या मागणीमुळे व आपण केलेल्या भावनिक संवादामुळे माझे पक्षकार व आपल्या आई, वडील, बहीण व इतर कुटुंबा समवेत चेंबुर शिंधी कॅम्प येथील प्लॅटवर दि. 14.01.2022 रोजी बौध्द रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. या बाबतीत सर्व पुरावे माझे पक्षकाराकडे आहेत. आपण आपल्या नावाने सिम कार्ड दिलेले आहे. त्या सिम कार्ड मधील संवाद, फोटो व कॉल डिटेल रेकॉर्ड माझे पक्षकाराकडे आहेत, त्यावरद आपली आई शंकुतला व बहिण हर्षदा व शिल्पा यांचे संभाषणचे रेकॉर्ड सुध्दा आहेत.
  • लग्नानंतर आपण माझे पक्षकारासो त पती पत्नी म्हणुन सिंधी कॉलनी, चेंबुर या ठिकाणी राहत असते व अधुन मधुन कामाच्या निमित्याने छत्रपती संभाजीनगर येथे येउन जाउन करीत असत. दरम्यान आपले व माझे पक्षकाराचे निथीमत शारीरिक संबंध राहिले आहे व त्यातुनच माझे पक्षकार गर्भवती राहिले असता आपण सध्यातरी आपलाला मुल नको म्हणुन आपण माझे पक्षकारचे गर्भपात केल्याबाबतचे कागदपत्री वैद्यकीय पुरावे आहेत.
  • माझे पक्षकाराने गर्भपातानंतर आपल्या व कुटुंबातील इतर सदस्यांच्या वागण्या व बोलण्यामध्ये खुप काही बदल दिसुन आला व आपण चेंबूर येथील घरी येण्यासही टाळाटाळ करू लागले. त्यामुळे माझे पक्षकाराचे मनात आपल्या विषयी शंका निर्माण होउ लागली की आपण त्यांना आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील घरी कधीही घेउन गेले नाहीत. माझे वडील आमदार आहेत, त्यांची समाजात प्रतिष्ठा आहे, माझी बहीण पायलेट आहे व मी सुध्दा शहराचा नगरसेवक आहे, आपण सामाजिकरित्या लग्न​​​​​​​ सार्वाजनिक करू तोपर्यंत तु सिंधी कॉलनी, चेंबुर या ठिकाणच्या प्लॅट मध्येच रहा. मी व माझे नातेवाईक संतत मुंबईला येत राहूत, तु काहीच काळजी करू नको अशी बतावणी करून तसेच भुल थापा देउन माझे पक्षकाराची दिशाभुल करीत होतात. यापूर्वी आपण सुनिता सिध्दांत सिरसाठ हिच्या बरोबर लग्न केल्याचे समजते, नंतर आपल्या सोबत कोमल साळवे यांच्यासोबत लग्न केले व ती सध्या आपल्या बरोबर राहते असे समजले. कारण आपणच ही बाब आपल्या मोबाईलवरून माझे पक्षकाराचे. व्हॉटसअपवर पाठवले. आपण व आपल्या घरातील आई, वडील व बहीण यांच्या कट कारस्थानामुळे व सध्याचे पालकमंत्री मा. संजयजी शिरसाठ यांच्या दबावामुळे घराची प्रतिष्ठा जाउ नये म्हणुन तु छत्रपती संभाजीनगर येथे येण्याची गरज नाही, तु चेंबुर येथेच राहा मी आठ दिवसाला नियमित येत जाईन तुला काही कमी पडू देणार नाही असे बोलुन तुम्हा माझे पक्षकारास धमकावले व खोटे आश्वासन दिले.
  • आपण दिनांक 17.04.2022 रोजी माझे पक्षकाराची माफी मागुन तु कुणासीही चर्चा करू नकोस जर तु कुणासही वाच्यता केली किंवा​​​​​​​ पोलिसामध्ये तकार केली तर मी माझया डोक्यात गोळी घालून आत्महत्या करून घेईन व त्यात तुझे नांव टाकीन त्यामुळे तुझे कुंटूंब रस्त्यावर येईल व तु पुर्णपणे उध्दवस्त होशील अशी धमकी तुम्ही माझे पक्षकारास दिली. तुम्ही डोक्याला पिस्तुल लावल्याचा फोटो माझे पक्षकाराकडे आहेत. नंतर मात्र तु​​​​​​​ आईवडीलकडेच रहा या Flat ची दुरूस्ती करण्याचे आहे. वरील तारखेच्या वेळेस तुम्हचे नेहमी नाशिक येथील हेमांगी पवार या महिलांचे संभाषण चालु होते. त्यानंतर माझे पक्षकाराने तुम्हास जाब विचारला असता, तुम्ही असे सांगितले की सदर Flat विकी करून टाकला आहे, यापुढे मला कुठलाही फोन करू नकोस नसता मी तुझे सर्व कुटूंब गुंडाकडून खत्म करीन. माझे वडील मंत्री होणार आहेत व ते मुख्यमंत्री मा. शिंदे याचे उजवे हात आहेत. माझे पक्षकारने दिनांक 20.12.2024 रोजी पोलिस स्टेशन​​​​​​​ शाहूनगर, मुंबई येथे रितसर तकार केली मात्र मा. संजय सिरसाठ हे कॅबिनेट व छत्रपती संभाजीनगर चे पालकमंत्री झाल्यामुळे त्यांनी पोलिसावर दबाव टाकल्यामुळे कार्यवाही होउ दिली नाही.
  • आपणास हया नोटीसद्वारे कळवण्यात येते की, आपण माझे पक्षकारास 7 दिवसांच्या आत नांदावयास घेउन जावे नसता माझे पक्षकार आपणा विरध्द व आपल्या कुटूंबाविरोधात मानसिक व शारिरिक छळ, केला व माझे पक्षकाराचे नावावर असलेला फॅट आपल्या नावावर न केल्यामुळे तसेच 50 लाख रूपये हुड्यापोटी न दिल्यामुळे आपल्या विरोधात महिला अत्याचार कायदा तसेच हुंडाप्रतिबंध कायदा तसेच इतर कायदयानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी तसेच या नोटीसचा​​​​​​​ खर्च रु 25000/- आपल्या कडून वसुल केला जाईल यांची नोंद घ्यावी. करीता ही कायदेशीर नोटीस.

Amravati Chikaldhara : अमरावतीत भीषण अपघात टळला! चिखलदऱ्यात कार 500 फूट दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावली

महाराष्ट्र भूस्खलनातील कार धक्कादायक फोटो: पावसाळ्यामध्ये रस्त्यावर वाहने सावकाश चालवा असं अनेकदा पोलिसांकडून जनजागृतीदरम्यान सांगितलं जातं. पावसाळी सहलींसाठी निसर्गरम्य ठिकाणांवर होणारी गर्दी लक्षात घेता असा पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक आणि पोलीसांची सुरक्षाही पुरवली जाते. मात्र अशा ठिकाणी अनेकदा अती उत्साही पर्यटक जीवाशी खेळ करावा असे काही प्रकार करतात. असाच एक प्रकार पावसाचं आगमन झाल्याचं पाहिल्याच दिवशी अमरावतीमध्ये घडला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीमधील चिखलदऱ्यामध्ये एक कार पाचशे फूट खोल दरीत कोसळताना थोडक्यात बचावली. अचानक आलेल्या पावसाने माती खचल्याने ही कार डोंगरमाथ्यावरुन दरीच्या बाजूला सरकली. टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाची ही कार पाचशे फूट खोल दरीत कोसळणार असं वाटत असतानाच ही कार डोंगरमाध्यावर अर्धवट अवस्थेत अडकून पडली.

सुदैवाने या कारमधील चारही युवकांचे प्राण वाचले आहे. ही डोंगरमाध्यावर अर्थवट दरीत कलंडलेली आणि अर्धवट वर असलेली कार पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली. या कारमधील लोकांचं काय झालं याबद्दल ही कार पाहणारा प्रत्येकजण विचारत होता. मात्र कोणाचीही जिवीतहानी झाली हे ऐकल्यानंतर बघ्यांचाही जीव भांड्यात पडला.

कार का खचू लागली?

चिखलदराच्या गाविलगड किल्ला परिसरातील ही घटना घडली. या विचित्र अपघाताची माहिती स्थानिक पोलीस व वन विभागाला देण्यात आली. काही तासांनंतर पोलीस आणि वन विभागाने संयुक्तरित्या ही कार क्रेनच्या मदतीने खेचून बाहेर काढली. अचानक आलेल्या पावसापासून वाचण्यासाठी या कारने प्रवास करणारे चारही पर्यटक तरुण कारमध्ये बसले होते. मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने जमीनीवरुन दरीच्या दिशेने वहणाऱ्या पाण्याचा प्रवास वाढला. कारमध्ये बसलेल्या तरुणांना याचा अंदाज आला नाही. पावसाच्या पाण्यामुळे डोंगरमाध्यमावर ज्या ठिकाणी कार उभी केली होती तिथली माती खचायला सुरुवात झाली.

प्रसंगावधान दाखवल्याने अनर्थ टळला

कार दरीच्या दिशेने खचत असल्याचं पर्यटकांच्या लक्षात आल्याने त्यांनी कारच्या विंडो वाजवून आत बसेलेल्या तरुणांना याबद्दल सांगितलं. तातडीने हे तरुण कारमधून खाली उतरुन दूर जाऊन उभे राहिले. कारमधील वजन कमी झाल्याने कार मातीत रुतून बसली आणि अधिक खचण्याऐवजी मातीत अडकली. वेळीच बघ्यांपैकी काहींनी प्रसंगावधान दाखवून या तरुणांना सतर्क केल्याने त्यांचे प्राण वाचले आणि कारही दरीत कोसळता कोसळता वाचली.

.

Nagpur : प्रेयसीने दुर्लक्ष केल्याने प्रियकराचे संतापत रूप; तीन दुचाकींना पेटवून दिलं, नागपुरात गोंधळ

प्रेमिकेने बोलणे बंद केल्यामुळे संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या घरी गोंधळ घालून वाहनांची जाळपोळ केली. या घटनेमुळे खळबळ माजली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पळून गेलेल्या प्रियकराचा शोध सुरू केला आहे.

प्रेमात अनेकदा कठीण प्रसंग येतात. अशा वेळी समजून घेत मार्ग काढायचा असतो. परंतु या प्रकरणात प्रियकराने थेट वाहनेच जाळली. खरे तर प्रेयसीने कुटुंबीयांच्या दबावाने बोलणे बंद केले होते. बोलणे बंद केल्याने प्रियकराने प्रेयसीच्या घरी गोंधळ घालून वाहनांची जाळपोळ केली. ही थरारक घटना कपीलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला. स्नेहल सुनील अंबादे (वय २२,रा. कपिलनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. तो पेंटिंगचे काम करतो.

स्नेहलचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेयसीसोबत (वय २२) प्रेमसंबंध आहे. त्यांच्या प्रेमाबाबत तिचा भाऊ अभिषेक याला माहिती मिळाली. त्याने आई-वडिलांना सांगितले. त्यामुळे प्रेयसीने स्नेहलसोबत बोलणे आणि भेटणे बंद केले. ती घरीच राहायची. प्रेयसी भेटत नसल्याने स्नेहल संतापला. त्याने तिला भेटण्याचा प्रयत्न केला असता भेटु शकला नाही.स्नेहल अंबादे शनिवारी मध्यरात्री प्रेयसीच्या पहिल्या माळ्यावरील खोलीजवळ गेला. यावेळी तिही खोलीत होती. त्याने दरवाजा ठोठावला. तिने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे संतापून गोंधळ घालून शिवीगाळ करायला लागला.

याचदरम्यान त्याने घरासमोरील तीन मोपेड जाळल्या. शेजारी जमले. त्यांनी प्रेयसीचा भाऊ अभिषेकला आवाज दिला. अभिषेकने दरवाजा उघडला असता वाहने जळताना दिसली. पाणी टाकून अभिषेक आणि शेजाऱ्यांनी आग विझवली. दरम्यान, स्नेहल पसार झाला. अभिषेकने कपिलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Nashik : नाशिकमध्ये आंतरजातीय विवाहातून सूनेवर अत्याचार; जबरदस्ती गर्भपाताचा धक्कादायक प्रकार उघड

नाशिक – नाशिकमध्ये एक अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. राज्यात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच, नाशिकमधून समोर आलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा आंतरजातीय विवाहानंतर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

या घटनेत एका महिलेचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. पीडित महिलेने सात वर्षांपूर्वी भूपेश पाठक या तरुणासोबत वैदिक पद्धतीने आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. मात्र हा विवाह फारसा कुणाला माहिती नव्हता आणि विवाहानंतरही दोघे आपापल्या घरीच राहत होते.

लग्नाच्या काही काळानंतर, त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आणि पीडित महिला गरोदर राहिली. याची माहिती पतीच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. विशेष म्हणजे, पीडितेच्या पतीची आई सुचित्रा पाठक ही नर्स असून, तिच्यावर घरातच जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

सासूने तिला तीन गर्भपाताच्या गोळ्या दिल्या आणि सलाइन लावली, असे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. एवढेच नव्हे तर, त्यानंतरही पतीने तिला स्वीकारण्यास नकार दिला. पीडितेचा आरोप आहे की, सासू, सासरे, नणंद आणि पती – चौघांनीही सातत्याने तिचा छळ केला आणि जातीवाचक शिवीगाळ करत तिला मानसिक त्रास दिला.

या प्रकरणी पीडित महिलेने नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीसांनी सुचित्रा पाठक, प्रवीण पाठक, स्मिता पाठक आणि भूपेश पाठक यांच्याविरोधात गंभीर गुन्हा नोंदवला आहे.

ही घटना नाशिकसह संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी असून, आंतरजातीय विवाह करणाऱ्या महिलांवरील अत्याचाराचा हा आणखी एक काळा अध्याय ठरतो. पोलिसांची चौकशी सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

Gadchiroli Naxal : छत्तीसगडमध्ये नक्षल नेता बसवराजूचा गुपचूप अंत्यविधी, कुटुंबीयांचा आक्षेप

गडचिरोली : चार दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या (Chhattisgarh Naxal) चकमकीत ठार झालेला नक्षलवादी (Gadchiroli Naxal) नेता बसवराजू सह काही नक्षलवाद्यांचे मृतदेहांवर छत्तीसगड पोलिसांनी सोमवारी सायंकाळी नारायणपूर (Narayanapur Naxal Encounter) मध्ये अंत्यसंस्कार केलेत. न्यायालयाच्या आदेशानंतरही कुटुंबीयांना मृतदेह न देता अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीय आणि सामाजिक संघटनांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

छत्तीसगड- महाराष्ट्र सीमेवर चार दिवसांपूर्वी  झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता गंगना उर्फ बसवराजूचा मृत्यू झाला होता. हा मृतदेह घेण्यासाठी बसवराजूचे काही नातेवाईक आणि मोठे भाऊ नारायणपूरला गेले होते. मात्र छत्तीसगडच्या सुरक्षा दलांनी त्यांना मृतदेह दिले नाही. त्यांच्यासोबत वेगळ्या पद्धतीची वागणूक देण्यात आल्याचा आरोप करत कुटुंबियांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर मृतदेह घेण्यासाठी छत्तीसगड पोलीस प्रशासनाकडे जाण्याची सूचना केली होती.

अंत्यसंस्कार करून मानवी हक्कांचा भंग- बेला भाटिया

दरम्यान, सोमवारी संध्याकाळी बसवराजुसह तब्बल आठ नक्षलवाद्यांवर नारायणपूर येथील स्थानिक आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन न करता पोलिसांकडून या आठही नक्षलवाद्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यात आंध्र प्रदेशातील दोन, तेलंगणातील तीन आणि छत्तीसगड येथील तीन अशा आठ नक्षलवाद्यांवर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना न देता अंत्यसंस्कार करून मानवी हक्कांचा भंग करण्यात आल्याच आरोप सामाजिक कार्यकर्त्या बेला भाटिया यांनी केला आहे.

पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ मध्ये काटेझरीतील बससेवेचा गौरवपूर्ण उल्लेख 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील संवाद कार्यक्रमात  गडचिरोली जिल्ह्यातील काटेझरी गावाचा विशेष उल्लेख करत, माओवादग्रस्त भागांमध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांवर प्रकाश टाकला. काटेझरी गावात २३ मार्च २०२५ रोजी पहिल्यांदाच बस पोहोचल्याच्या घटनेचे पंतप्रधानांनी कौतुक केले, आणि या घटनेने त्या भागातील विकासाची गाथा अधोरेखित केली. पंतप्रधानांनी सांगितले की, “मी तुम्हाला, जिथे पहिल्यांदाच एक बस पोहोचली, अशा एका गावाबद्दल आज सांगू इच्छितो, त्या दिवसाची त्या गावातले लोक अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत होते.

“त्यांनी पुढे म्हटले की, जेव्हा गावात पहिल्यांदा बस आली, तेव्हा लोकांनी ढोल-नगारे वाजवून तिचं स्वागत केलं. बस पाहून लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. काटेझरी गावात पक्की सडक असूनही, लोकांना वाहतुकीची गरज असूनही यापूर्वी कधीही तिथे बस सेवा सुरू झाली नव्हती. याचे मुख्य कारण म्हणजे हा गाव माओवादी हिंसाचारानं प्रभावित होता. काटेझरीमध्ये झालेल्या या बदलाचा आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आता या भागातील परिस्थिती वेगाने सामान्य होत आहे. माओवादाविरुद्धच्या सामूहिक लढाईमुळे आता अशा दुर्गम आणि माओवादग्रस्त भागांपर्यंतही मूलभूत सोयी-सुविधा पोहोचू लागल्या आहेत, हे या घटनेतून सिद्ध होते. पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ मधील या उल्लेखाने गडचिरोली जिल्ह्यातील विकासात्मक कामांना, विशेषतः नक्षलवाद विरोधी मोहिमेला आणि त्यातून सामान्य नागरिकांना मिळत असलेल्या लाभांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे.