back to top
Sunday, June 1, 2025
12.3 C
London
Home Blog Page 12

बेंगळुरू: महिलेने पतीची हत्या केली, आईच्या मदतीने कट रचला

गुन्हेगारीची बातमीः बंगलोरची महिला आणि तिच्या आईने व्यावसायिकाच्या लोकलथ सिंगला ठार मारले. त्यांनी झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि त्याला बेशुद्ध केले आणि मग त्याला गळा आवळला. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

बेंगळुरूमध्ये एक आश्चर्यकारक प्रकरण उघडकीस आले आहे. एका महिलेने आपल्या पतीच्या अनेक बेकायदेशीर संबंध आणि बेकायदेशीर व्यवसायाची हत्या केली आणि तिची हत्या केली. तिच्या आईसह या बाईने प्रथम पतीला खाण्यामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून बेशुद्ध केले आणि नंतर तिचा गळा दाबला.

पोलिसांनी सांगितले की, आई आणि मुलीला 37 वर्षांच्या रिअल इस्टेटचा व्यापारी लोकनथ सिंग यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एनडीटीव्हीच्या अहवालानुसार पोलिसांनी सांगितले की, शनिवारी चिककाबिनच्या निर्जन भागात काही लोकांना दावा न केलेल्या कारमध्ये मृतदेह सापडला तेव्हा ही घटना उघडकीस आली.

नॉर्थ बंगलोर पोलिसांचे पोलिस आयुक्त (डीसीपी) साल्सुल अदावथ यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, ‘आम्हाला शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता ११२ वाजता आपत्कालीन कॉल आला, ज्यामध्ये मृतदेहाविषयी माहिती देण्यात आली. आम्ही त्याच्या पत्नी आणि आईला गुन्ह्यासाठी अटक केली आहे. पुढील तपासणी चालू आहे.

पोलिसांनी उघडकीस आणले की प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की आरोपींनी पहिल्या व्यक्तीच्या अन्नामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या आहेत जेणेकरून तो अशक्त होईल. मग त्यांनी त्याला वाळवंटात नेले आणि चाकूने त्याचा गळा दाबला आणि पळून गेला. या हत्येचे कारण पीडिताचे बेकायदेशीर संबंध आणि बेकायदेशीर व्यवसाय व्यवहार असल्याचे म्हटले गेले.

पोलिसांनी सांगितले की, लोकनाथचे दोन वर्ष या महिलेशी संबंध होते आणि तिने डिसेंबरमध्ये कुनिगलमध्ये लग्न केले. तथापि, वयातील फरकांमुळे त्याच्या कुटुंबाने या नात्याचा विरोध केला होता आणि कोणालाही लग्नाबद्दल माहिती नव्हती. लग्नानंतर लवकरच लोकनथ आपल्या पत्नीचे घर सोडले. त्याच्या कुटुंबास दोन आठवड्यांपूर्वी लग्नाबद्दल माहिती मिळाली. दरम्यान, लोकनथची पत्नी आणि लाव्हमध्ये तिच्या कथित अवैध संबंध आणि बेकायदेशीर व्यवसायिक कार्याबद्दल माहिती मिळाली.

 

हे संबंध ढासळले कारण या जोडप्याने बर्‍याचदा भांडण केले आणि घटस्फोटाचा विचार केला जात होता. जेव्हा लोकनथने त्याच्या लव्हमध्ये धमकी देण्यास सुरुवात केली आणि गंभीर परिणामाचा इशारा दिला तेव्हा त्याची पत्नी आणि त्याच्या आईने तिला ठार मारण्याची योजना आखली तेव्हा ही परिस्थिती आणखीनच वाढली. बंगळनाथ बेंगळुरू मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या फसवणूकीच्या प्रकरणात लोकनथची चौकशी सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

 

महाकालेश्वरच्या मंदिरात पोहोचण्याआधीच भीषण अपघातात! भिवंडीतील दोन्ही डॉक्टर बहिणींचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात देवदर्शनासाठी गेलेल्या डॉक्टरांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन डॉक्टर बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्यप्रदेशातील शिवपुरी येथे झालेल्या या अपघातात डॉ.तन्वी आचार्य (50) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या डॉ.नीलम पंडित (55) यांनी रुग्णालयात उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला. उज्जैनला जात असताना रविवारी सकाळी गुना-शिवपुरी या मार्गावर हा अपघात झाला. तर आणखी चौघे जणा गंभीर जखमी आहेत. डॉ. उदय जोशी (64),डॉ. सीमा जोशी (59) दोघे रा.दादर,डॉ.सुबोध पंडित (62) रा.वसई, डॉ.अतुल आचार्य (55) रा. भिवंडी अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर तेथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेची माहिती समजताच भिवंडीत हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉक्टर अतुल आचार्य यांच्या पत्नी आणि मेहुणीच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून वैद्यकीय वर्तुळातही दुःखाचे वातावरण आहे.

मंदिरात पोहोचण्याआधीच काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार,हे सर्व डॉक्टर कुटुंबीय महाराष्ट्रातून कारने तीर्थयात्रा करण्यासाठी गेले होते. अयोध्या येथील दर्शनानंतर हे सर्व कारने उज्जैन येथील महाकालेश्वर दर्शनासाठी निघाले होते. पण या प्रवासादरम्यान मध्य प्रदेश येथील शिवपुरी जिल्ह्यातील कोलारस पोलिस ठाणे क्षेत्रातील लुकवासा चौकी अंतर्गत गुना शिवपुरी या महामार्गावर भरधाव कार अनियंत्रित झाल्याने कार पुलाला ठोकर मारून नजीकच्या खड्ड्यात कोसळली. पुढल्या मंदिरात जाण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि दोघींनी जीव गमवावा लागला. हा अपघात एवढा जबरदस्त होता की या अपघातामध्ये दोन महिला डॉक्टर बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर इतर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे हे वृत्त आणि दोन बहिणींचा मृत्यू यामुळे भिवंडीत हळहळ व्यक्त होत आहे.

एकनाथ मिंधेंनी फडणवीसांना दुबळे केले: आदित्य ठाकरे यांचा आरोप; कुणाल कामराचे गाणे योग्यच असल्याचे नमूद करत केली पाठराखण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मिंधे असा करत स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराची पाठराखण केली आहे. विनोदी कलाकार कुणाल कामराने एकनाथ मिंधे यांच्यावर केलेले गाणे योग्

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या गाण्याद्वारे त्याने शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केले होते. विशेषतः एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख त्यांनी गद्दार असा केला होता. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी शिवसेनेचे पित्त खवळले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमधील कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी कुणाल कामराची पाठराखण करत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मिंधेंनी मुख्यमंत्र्यांना दुबळे केले – आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की, विनोदी कलाकार कुणाल कामराने जिथे एकनाथ मिंधेंवर गाणे सादर केले, त्या कॉमेडी शोचा स्टेज मिंधेंच्या भ्याड टोळीने फोडला. कुणाल कामराचे गाणे 100 टक्के खरे होते. एखाद्याच्या गाण्यावर फक्त एक असुरक्षित घाबरट व्यक्तीच अशी प्रतिक्रिया देईल. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे का? एकनाथ मिंधे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना कमकुवत करण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे.

…तर माझ्यावर दररोज गुन्हे दाखल होतील – संजय राऊत

दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मी कुणाल कामराला खूप दिवसांपासून ओळखतो… तो आमच्यावर अशाच प्रकारे टिप्पणी करायचा. माझा असा विश्वास आहे की, देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. जर वैयक्तिक टिप्पणी नसेल तर ती स्वीकारली पाहिजे. जर टिप्पणी कोणत्याही राजकीय विचारसरणीवर असेल तर ती स्वीकारली पाहिजे. हे आपल्या देशाच्या लोकशाहीचे सौंदर्य आहे. कुणाल कामरा यांचे कार्यालय, स्टुडिओची तोडफोड करण्यात आली… ही गुंडगिरी आहे, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मी रोजच टीकात्मक लिहित असतो. ते माझे काम आहे. या न्यायाने माझ्यावर दररोजच गुन्हे दाखल होतील. विधानसभेतील सदस्यांचे कामकाज पाहिले तर त्यांच्यावर देखील रोज गुन्हे दाखल होतील. एकनाथ शिंदे यांचे सभागृहातील भाषण वाचले, तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल होतील. कमजोर लोकांवर का गुन्हे दाखल करता? असा सवालही यावेळी राऊत यांनी उपस्थित केला आहे.

स्वातंत्र्याचा स्वैराचार मान्य नाही – फडणवीस

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराकडून स्वातंत्र्याचा स्वैराचार केल्याप्रकरणी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. स्टँडअप कॉमेडी करण्याचा सर्वांना अधिकार. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कुणालाही अधिकार नाही. महाराष्ट्राच्या जनतेने 2024 च्या निवडणुकीत कोण गद्दार व कोण खुद्दार आहे हे दाखवून दिले आहे. कुणाकडे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कुणाला मिळाला आहे हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांचा अनादर करण्याचा अधिकार कुणालाही नाही. तुम्ही जरूर व्यंग व कॉमेडी करा. पण कुणालाही कुणाचा अपमान करण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणाले.

कुणाल कामराने माफी मागावी -फडणवीस: म्हणाले – स्टँडअप कॉमेडी करण्याचा सर्वांना अधिकार, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार मान्य नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी या प्रकरणी स्टँडअप कॉमेडी करण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार कदापी मान्य नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. कुणाल कामरा

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या गाण्याद्वारे त्याने शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केले होते. विशेषतः एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख त्यांनी गद्दार असा केला होता. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी शिवसेनेचे पित्त खवळले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमधील कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त भूमिका विषद केली आहे.

कोण गद्दार व कोण खुद्दार हे जनतेने स्पष्ट केले

देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्टँडअप कॉमेडी करण्याचा अधिकार कुणालाही आहे. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाही नाही. खरे म्हणजे कुणाल कामराला हे माहिती पाहिजे की, महाराष्ट्रातील जनतेने 2024 साली कोण गद्दार व कोण खुद्दार आहे? हे दाखवून दिलेले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कोणाकडे गेल? हे जनतेने ठरवलेले आहे. त्यामुळे अशा प्रकारे खालच्या पातळीवरची कॉमेडी करून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असा अनादर करण्याचा अधिकार कुणालाही नाही.

कुणाल कामराने माफी मागावी

तुम्ही कॉमेडी अवश्य करा, पण त्याद्वारे कुणी अपमानित करण्याचे काम करत असेल तर हे सहन केले जाणार नाही. हे अतिशय चुकीचे आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे.

कुणाल कामरा जे संविधानाचे पुस्तक दाखवत आहेत, ते संविधान त्यांनी वाचले असेल तर संविधानानेच सांगितलेले आहे की, स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा…

एकनाथ मिंधेंनी फडणवीसांना दुबळे केले:आदित्य ठाकरे यांचा आरोप; कुणाल कामराचे गाणे योग्यच असल्याचे नमूद करत केली पाठराखण

मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मिंधे असा करत स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराची पाठराखण केली आहे. विनोदी कलाकार कुणाल कामराने एकनाथ मिंधे यांच्यावर केलेले गाणे योग्यच आहे. आता मिंधे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कमकूवत केले आहे, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर

Devendra Fadnavis On Kunal Kamra Eknath Shinde Comment

 

Devendra Fadnavis On Kunal Kamra Eknath Shinde Comment: मुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भात वादग्रस्त गाणं तयार केल्याने कुणाल कामराविरोधात शिवसैनिक आक्रमक झालेले असतानाच फडणवीसांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकारांशी बोलताना फडणवीसांनी दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारं स्वातंत्र्य मान्य करता येणार नाही, असं कामराने केलेल्या टीकेबद्दल म्हटलं आहे.

खालच्या दर्जाची कॉमेडी​…

पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी कामराने शिंदेंवर केलेल्या वादग्रस्त गाण्याबद्दल भाष्य केलं. “स्टॅण्डअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणाला नाही. कोणाकडे स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत कोणाकडे गेली हे जनतेनं ठरवलं आहे. अशाप्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करुन अनादर करण्याचा कोणाचाही अधिकार नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री राज्याचे वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्याच्या जनतेमध्ये आदर आहे. त्यांच्याबद्दल अशाप्रकारचं व्यंग करणं अत्यंत चुकीचं आहे,” असं फडणवीस म्हणाले आहेत.

माफी मागितली पाहिजे

“तुम्ही जरुर कॉमेडी करा, व्यंग करा पण अपमानित करण्याचं काम कोणी केलं तर हे सहन केलं जाणार नाही. हे अतिशय चुकीचं आहे. कामरांनी माफी मागितली पाहिजे. ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत. त्यांनी जर संविधान वाचलं असेल, त्यांना संविधानाची माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करता येणार नाही. म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे,” असं फडणवीस म्हणाले.

गद्दार म्हणू शकत नाही

“बाळासाहेबांचा वारसा शिंदेंकडे असल्यावर जनतेनं शिक्कामोर्तब केलं आहे. तर कोणी कॉमेडियन उभं राहून त्यांना अशाप्रकारे गद्दार म्हणू शकत नाही. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांबरोबर गद्दारी केली त्यांना घरी पाठवण्याचं काम जनतेनं केलं आहे,” असा टोला फडणवीसांनी लागवला आहे. “खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेनं 2024 मध्ये कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे,” असंही फडणवीस म्हणाले.

कायदेशीर कारवाईचा इशारा

“मी असं मानतो की कॉमेडी करण्याचा अधिकार आहे. आमच्यावरही व्यंग करा यात काही वाईट वाटणार नाही. मात्र मुद्दाम एवढ्या मोठ्या नेत्यांना बदनाम करण्याचं कोणी काम करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल,” असंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut : मुंबई पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे, कुणाल कामरा प्रकरणावरून राऊतांचा टोला..

कॉमेडीयन कुणाल कामराला मी आज ओळखत नाही. त्याने यांच्यावर देखील अशा पद्धतीची टीका याआधी केलेली होती. तेव्हा पासून मी त्याला ओळखतो, असं खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. कॉमेडीयन कुणाल कामरा याने शिवसेना शिंदे गटावर गाणं तयार करून विडंबन केलं आहे. त्याचा व्हिडिओ काल संजय राऊत यांनी शेअर केला होता. त्यानंतर आता नवीन वादाला तोंड फुटलं आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी आज शिंदे गटावर टीका केली.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. बोलण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. जोवर टीका वैयक्तिक पातळीवर केली जात नाही तोवर तुम्हाला अशा राजकीय विचारधारेवर झालेल्या टीकेचा स्वीकार करायला हवा. हीच लोकशाही आहे. कुणाल कामराचं ऑफिस, स्टुडिओची तोडफोड केली, ही गुंडागर्दी आहे. नागपूर राड्यात झालेल्या नुकसानीची भरपाई आरोपींकडून केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मग काल खारमध्ये जी तोडफोड झाली त्याची भरपाई कोण करेल? असा प्रश्न उपस्थित करत अत्यंत कमजोर गृहमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे, अशी खोचक टीका यावेळी संजय राऊत यांनी केली आहे.

Kunal Kamra Video : कुणाल कामराची करामत अन् शिवसेना आक्रमक, शिंदेंवरील ‘या’च गाण्यामुळं पेटला वाद

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या शिंदे यांच्यावरील गाण्यामुळे वाद उपस्थित झाला आहे. शोमधील ‘गद्दार नजर आए’ या कुणालच्या गाण्यामुळे वाद निर्माण झाला. या गाण्यात त्याने एकनाथ शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केला आहे. राहुल कनाल यांच्यासह शिवसैनिकांकडून द हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड करण्यात आली आहे. कुणाल कामराला काळा फासण्याचा शिवसेना नेत्यांनी आता इशारा दिला आहे. तर कुणाल का कमाल, कामरावर राऊतांनी ट्विट करत शिंदे यांच्या शिवसेनेला डिवचलं होतं. कुणाल कामराचा एक गाणे त्याची स्टँडअप कॉमेडीचा तो व्हिडिओ शेअर केला होता संजय राऊत यांनी. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. ज्या ठिकाणी या गाण्याचं सगळं शूटिंग झालं त्या हॉटेलच्या त्या सेटची तोडफोड देखील शिवसैनिकांकडून करण्यात आलेली आहे. शोमधील गद्दार नजर आहे या कुणाल कामराच्या गाण्यामुळे हा सगळा वाद उपस्थित झालाय. कुणालने शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख करत सादर केलेल्या गाण्यामुळे हा मोठा वाद झाला आहे. या प्रकरणी राहुल कनाल, कुणाल सरमळकर यांना खार पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तर आमदार मुरजी पटेल यांच्याकडून अंधेरीमध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्यात कामराविरुद्ध तक्रार करण्यात आली. कुणालने माफी मागावी यासाठी शिवसेनेचे सर्व कार्यकारी नेते आक्रमक झाले.

‘विधानसभेत सगळे खोक्याभाईच भरलेत’; राज ठाकरेंच्या निशाण्यावर नेमकं कोण?

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून मुंबईत काही नव्या पदरचना करण्यात आल्या आहेत, यावेळी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. मनसेच्या पदाधिकारी बैठकीत राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. एक खोक्याभाई काय घेऊन बसला आहात. विधानसभेत सगळेच खोक्याभाई भरलेत, मुळ विषय राहातात बाजुला, तुम्हाला भलत्याच विषयांमध्ये भरकटून टाकलं जात आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 

मनसेच्या पदाधिकारी बैठकीत बोलताना राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. एक खोक्याभाई काय घेऊन बसला आहात, अख्खी विधानसभाच भरली आहे. विधानसभेत सगळे खोक्याभाईच भरले आहेत. मुळ विषय राहतात बाजूला तुम्हाला भलत्याच विषयांमध्ये भरकटून टाकलं जात आहे, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये महापालिका निवडणुका लागू शकतात असे संकेत मिळत आहेत. राजकीय पक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. मनसेनं देखील आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नव्या पदरचना केल्या आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे हे मनसेचे मुंबईचे शहराध्यक्ष असणार आहेत. तर अमित ठाकरे यांच्यावर शाखाध्यक्षांची जबाबदारी देण्यात आली आहे.

याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, मुंबईमध्ये काही नव्यानं पदरचना आम्ही केल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदाच मुंबईला शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष पद देण्यात आलं आहे. आतापर्यंत पक्षात फक्त विभागाध्यक्ष हे पद होतं. आता शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष हे पद देखील असणार आहे. कोणी -कोणी काय-काय करायचं हे मी आता त्यांना दोन एप्रिलला सांगणार आहे. काय -काय काम कारायचं आहे, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत. कोणत्या चौकटीमध्ये काम करायचं आहे. या सगळ्या गोष्टी त्यांना लेखी स्वरुपात देण्यात येणार आहेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

ipl 2025 तिकिटे ऑनलाईन ipl सामन्याचे वेळापत्रक कसे बुक करावे ? | आयपीएल पाहण्यासाठी येथून ऑनलाईन बुक करा

 

 

आयपीएल 2025 तिकिटः आयपीएल 2025 या वर्षी 22 मार्चपासून सुरू होणार आहेत. जर आपल्याला स्टेडियममध्ये बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा असेल तर आपण त्यासाठी एक युक्ती ऑनलाइन बुक करू शकता. येथे कसे शिका

 

  • आयपीएल 2025 सामने 22 मार्चपासून सुरू होतील.
  • एकूण 74 सामने, 12 डबल-हेडर.
  • पेटीएम वर ऑनलाईन टिक बुकिंग बुकमीशो करा.

नवी दिल्ली. भारतात क्रिकेट सामना उत्सवापेक्षा कमी नाही. जर आपण क्रिकेटर फॅन देखील असाल तर उत्सवाचा हंगाम आपल्यासाठी सुरू होईल. भारतातील क्रिकेटच्या नियंत्रण मंडळाने (बीसीसीआय) टाटा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२25 च्या १th व्या जोडीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा 22 मार्च 2025 रोजी सुरू होईल आणि 25 मे 2025 रोजी अंतिम सामन्यासह समाप्त होईल. आम्हाला कळवा की एकूण 74 सामने 13 ठिकाणी खेळले जातील, त्यामध्ये 12 डबल-हेडरसह. दुपारचे सामने सायंकाळी साडेतीन वाजता भारताप्रमाणे सुरू होतील, तर संध्याकाळी सामने सायंकाळी साडेसात वाजता सुरू होतील.

 

कोलकाता नाइट राइडर (केकेआर) आणि रॉयल चॅलेन्जर बंगलोर (आरसीबी) यांच्यात उच्च व्होल्टेज सामन्यापासून ही स्पर्धा सुरू होईल. 22 मार्च रोजी कोलकातामधील आयडन गार्डन येथे हा सामना होणार आहे. 23 मार्च रोजी दोन सामने असतील. दुपारी सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) यांच्यात सामना होईल. संध्याकाळी मुंबई इंडियन्स (एमआय) आणि पाच -टाइम चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यात असेल. हैदराबाद (एसआरएच) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (एमआय) आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) मध्ये चेन्नईमध्ये जुळले जातील. आपण हा सामना स्टेडियममध्ये बसलेला पाहू इच्छित असल्यास, आपण त्यासाठी ऑनलाइन टिक देखील बुक करू शकता. येथे कसे शिका

 

आयपीएल 2025 टिकट ऑनलाईन कसे बुक करावे
आपण घरी बसून सहजपणे ऑनलाइन आयपीएल बुक करू शकता. भारतातील क्रिकेटच्या नियंत्रण मंडळाने (बीसीसीआय) अद्याप बुकिंग प्रक्रियेची निश्चित घोषणा केली नाही, परंतु गेल्या हंगामाच्या दृष्टीने असे म्हटले जाऊ शकते की ते ऑनलाइन खरेदी केले जाऊ शकते.

 

आयपीएल 2025 बुकिंगची पद्धत ऑनलाईन
1. बुकिंग वेबसाइटवर बुकमीशो, पेटीएम, आयपीएलटी 20.com सारख्या वेबसाइटवर जा.
2. आता आपण सामना पाहू इच्छित आहात, त्यासाठी स्टेडियम निवडा.
3. आपल्या स्वतःसाठी सीट श्रेणी निवडा, जसे की सामान्य, मध्यम श्रेणी, प्रीमियम किंवा व्हीआयपी.
4. चेकआउटला देय तपशील द्या.
5. आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा यूपीआय किंवा नेट बँकिंगसह पैसे द्या.
6. आपल्याला ईमेल किंवा एसएमएसद्वारे पुष्टीकरण मिळेल.

 

लेनोवो आयडिया टॅब प्रो शक्तिशाली वैशिष्ट्यांसह भारतात लाँच केले आणि किंमत आणि स्पर्धा माहित आहे

 

लेनोवोने आपला अँड्रॉइड टॅब लेनोवो आयडिया टॅब प्रो लाँच केला आहे. हा टॅब, जो उत्कृष्ट वैशिष्ट्ये आणि शक्तिशाली बॅटरीसह येतो, उत्पादकता तसेच करमणुकीचा देखील आनंद घेऊ शकतो. हे सीईएस 2025 मध्ये घोषित केले गेले होते आणि आता सर्कल टू सर्च आणि गूगल मिथुन सारख्या एआय वैशिष्ट्यांसह लाँच केले गेले आहे. आम्हाला त्याची वैशिष्ट्ये, किंमत आणि स्पर्धा इत्यादीबद्दल जाणून घ्या

लेनोवो आयडिया टॅब प्रो ची वैशिष्ट्ये

लेनोवो आयडिया टॅब प्रो मध्ये 12.7 इंच एलटीपीएस एलसीडी स्क्रीन आहे, जी 3 के रेझोल्यूशन, 144 एचझेड रीफ्रेश रेट आणि 400 नॉट्स पीक ब्राइटनेससह येते. यात डॉल्बी अ‍ॅटॉम सपोर्टसह क्वाड जेबीएल स्पीकर सेटअप आहे. फिंगरप्रिंट सेन्सर पॉवर बटणासह समाकलित केले आहे आणि ते फेसिडला देखील समर्थन देते. यात मेडियाटेक डोमेनिटी 8300 चिपसेट आहे, जे मल्टीटास्किंग सुलभ करते.

कॅमेरा आणि बॅटरी

या टॅबमध्ये 13 एमपीचा मागील कॅमेरा आहे, जो ऑटोफोकस आणि एलईडी फ्लॅशसह येतो. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी, ऑटोफोकससह 8 एमपी फ्रंट कॅमेरा मिळतो. यात 10,020 एमएएचची शक्तिशाली बॅटरी आहे, जी 45 डब्ल्यू फास्ट वायर्ड चार्जिंग समर्थनासह येते.

किंमत आणि स्पर्धा

भारतातील त्याची सुरुवातीची किंमत 27,900 रुपये ठेवली गेली आहे. 21 मार्चपासून भारतात त्याची विक्री सुरू होणार आहे. या किंमत विभागात, झिओमी पॅड 7 कडून एक स्पर्धा मिळेल. झिओमी पॅड 7 मध्ये 11.2 इंच आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे, जो 3.2 के रिझोल्यूशनसह येतो. हे 144 हर्ट्झ अ‍ॅडॉप्टिव्ह रीफ्रेश रेटला समर्थन देते. नॅनो टेक्स्चर डिस्प्ले त्याच्या शीर्ष प्रकारांमध्ये दिले गेले आहे. प्रोसेसरबद्दल बोलणे, हे स्नॅपड्रॅगन 7+ जनरल 3 चिपसेटसह सुसज्ज आहे. शाओमी पॅड 7 मध्ये शक्तीसाठी 8,850 एमएएचची मजबूत बॅटरी आहे.

तसेच वाचन-

सामग्री निर्माते मजा करणार आहेत! सरकार पैसे, अब्जावधी निधी देईल