back to top
Sunday, June 1, 2025
14.4 C
London
Home Blog Page 2

Amravati : टँकर फसला, विमान थांबले! अमरावती विमानतळावर प्रवाशांचे हाल

Amravati Airport : राज्यात मान्सूनने दमदार एंट्री केली पहिल्याच पावसात सर्वत्र एकच दाणादाण उडाल्याचे बघायला मिळाले आहे. दरम्यान या पावसाचा फटका अमरावती विमानतळावर देखील बसल्याचे बघायला मिळाले आहे. विमानामध्ये पेट्रोल भरणाऱ्या टँकर मातीत फसल्याने अमरावती विमानतळावरुन मुंबईला जाणाऱ्या विमान फेरी ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. मात्र ऐनवेळी उड्डाण रद्द झाल्याने अमरावती विमानतळावर प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचे बघायला मिळालंय. परिणामी यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झालाय.

विमान फेरी ऐनवेळी रद्द, विमानतळावर 74 प्रवाशांचे हाल

पुढे आलेल्या माहितीनुसार, अमरावती विमानतळावरून नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेचारच्या सुमारास 74 प्रवासी याच विमानाने मुंबईला जाणार होते. त्यापूर्वी अमरावती विमानतळावर टँकरद्वारे विमानात पेट्रोल भरले जाणार होतं. मात्र, सोमवारी पेट्रोलचा टँकर मातीत फसला. पर्यायाने नियोजित वेळेत विमानात पेट्रोल भरता आले नाही. सुरुवातीला पायलटने सर्व प्रवाशांना विमानात बसण्याची परवानगी दिली. प्रवाशांनी आपले सीटबेल्ट सुद्धा बांधले. याचदरम्यान पायलट कॉकपीटमधून बाहेर आला आणि त्याने सर्व प्रवाशांना विमानाखाली उतरवले. तोपर्यंत सायंकाळ झाल्याने आणि नाईट लँडिंगची सुविधा नसल्यामुळे विमान उड्डाण करणार नसल्याचे त्याने प्रवाशांना सांगितले. अनेकांनी विमानतळ प्राधिकरण आणि संबंधित अधिकाऱ्यांशी वाद घालणे सुरू केले. मात्र, त्याचा काही एक फायदा झाला नाही. मात्र याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला.

मागच्याच महिन्यात अमरावतीकरांसाठी  विमानतळाचे उद्घाटन

अमरावतीकरांसाठी  16 एप्रिल 2025 या दिवशी अमरावती विमानतळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अमरावती विमानतळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. यावेळी 72 सीट आसनी पहिलं विमान अमरावती विमानतळावर दाखल झालं होतं. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीसह महायुतीतील अनेक प्रमुख नेते या उद्घाटन सोहळ्याला हजार होते. दरम्यान, या  विमानतळा उद्घाटन सोहळ्यासोबतच दक्षिण आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्रही सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

मुरबाडमध्ये वीज पडून 16 वर्षीय मुलाचा मृत्यू 

मुरबाड तालुक्यातील इंदे गावात एका 16 वर्षीय मुलाच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. यश रमेश लाटे असं या दुर्दैवी मुलाचं नाव आहे. यश दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाला होता. गुरांच्या गोठ्यावर  वीज पडल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे मुरबाड तालुक्यात शोक व्यक्त होत असून या कुटुबांला शासकीय मदत मिळावी, अशी मागणी केली जातेय.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

Akola News: अकोला: दारूच्या नशेत पीएसआयची डॉक्टराला शिवीगाळ, निलंबनाची धमकी!

Akola News : अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात PSI अर्थातच पोलिस अधिकारी (Akola Police)आणि एका शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचा शाब्दिक वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. या व्हिडिओमध्ये पीएसआय (PSI) अर्थातच पोलीस अधिकारी दारूच्या नशेत शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करत निलंबनाच्या कारवाईची धमकी देत आहे, असा आरोप करीत या वैद्यकीय अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तक्रार केलीय. तू आरोग्यसेवा देण्यात हजर का राहत नाही? या कारणांवरून या दोघांमध्ये हा शाब्दिक वाद झाल्याचे बोलल्या जातंय.

निलंबनाच्या कारवाईची धमकी, पीएसआयवर कठोर कारवाईची मागणी 

दरम्यान, अकोल्यातीलचं दहीहंडा आरोग्य प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सागर कळसकर आणि दहीहंडा पोलीस स्टेशनचे PSI प्रभुदास गंडलिंगे यांचा वादाचा हा video सर्वत्र वायरल होत आहे. गंडलिंगे या पीएसआयने शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याची वाद घालत ‘तू आरोग्य केंद्रात हजर का राहत नाही?’, असा सवाल विचारत थेट डॉक्टराला शिवगाळ घातलीय. इतकंच नाही तर पुढं निलंबनाच्या कारवाईची धमकी दिलीय. असा आरोप या डॉक्टराने तक्रारीतून केलाय. या पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याची तक्रार वैद्यकीय अधिकाऱ्याने अकोल्याच्या पोलीस अधीक्षकांकडे केलीय. शिवीगाळ करणाऱ्या पीएसआयवर कठोर कारवाईची मागणी आता या डॉक्टराकडून होत आहे. नेमकं आता संपूर्ण प्रकार नंतर वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Vaishnavi Hagavane Death Case : वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावणाऱ्या निलेश चव्हाणला पोलीस करणार अटक

पुण्यातील विवाहीत महिला वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणात काल तिचे सासरे आणि दीर यांना अटक करण्यात आली. तिचा नवरा, नणंद आणि सासू आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत. काल पहाटे पोलिसांनी कारवाई करक स्वारगेट परिसरातून सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील यांना अटक केली असून त्यांना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. दरम्यान याच प्रकरणात आता आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस हे निलेश चव्हाणला अटक करणार आहेत. वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बंदुकीचा धाक दाखवत वैष्णवीच्या माहेरच्या लोकांना निलेशने धमकावलं असा आरोप आहे.

त्यामुळे आता वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. आमची मुलगी, वैष्णवी हिचा छळ करण्यामध्ये आणि हगवणे कुटुंबीयांच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंड निलेश चव्हाणचा देखील सहभाग आहे, असा आरोप कुटुंबियांना केला होता. या प्रकरणी आता पिंपरी चिंचवड पोलीसांच्या गुन्हे शाखेची दोन पथके निलेश चव्हाण शोध घेत आहे, अशी माहिती समोर आली आहे.

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या बालाला घेण्यासाठी तिचे माहेरचे गेले होते, मात्र निलेश चव्हाण याने बंदुकीचा धाक दाखवत वैष्णवीचं बाळ त्यांना देण्यास नकार दिला होता ,त्याबाबत त्याच्या विरुद्ध पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र निलेश चव्हाण अजूनही फरार आहे.

दरम्यान आज राज्याचे उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी 4 वाजता कस्पटे कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी येणार आहेत. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कस्पटे कुटुंबियाशी फोनवरून संवाद साधत त्यांचं सांत्वन केलं होतं तसंच याप्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा करून, तुम्हाला पाहिजे तो वकील देऊ असं आश्वासनही दिलं होतं. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काल संध्याकाळी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती.

फरार असताना राजेंद्र हगवणे शेतातील शेडमध्ये लपले

वैष्णवी यांचा मृत्यू झाल्यानंतर तिचे सासरे राजेंद्र हगवणे हे फरार झाले होते. यादरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी वास्तव्य केल्याचं पोलीस तपासात समोर आल आहे. त्यांनी सातारा जिल्ह्यातल्या पुसेगाव येथील अमोल जाधव नामक व्यक्तीच्या शेतातील जनावराच्या शेडमध्ये देखील मुक्काम केल्याची माहिती समोर येत आहे.. फरार असताना राजेंद्र हगवणे नेमके कुठे कुठे थांबले होते, त्यांना कोणी मदत केली होती याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

51 तोळ्यांचे दागिने बँकेकडे गहाण

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासरा राजेंद्र, दीर सुशील यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. दोघांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. वैष्णवी यांना विवाहात देण्यात आलेले 51 तोळे सोन्याचे दागिने बँकेकडे गहाण ठेवण्यात आले आहे. वैष्णवीला तिचे सासरे आणि दिराने वेळोवेळी मारहाण केल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. तपासासाठी दोघांना 28 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एच. बारी यांनी शुक्रवारी दिला.

दोन वर्षांपूर्वी वैष्णवीचा आत्महत्येचा प्रयत्न

सासरच्या छळाला कंटाळलेल्या वैष्णवी हगवणेने दोन वर्षांपूर्वी, म्हणजेज 27 नोव्हेंबर 2023 रोजी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिने कीटकनाशक प्राशन करून जीव देण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी खासगी रुग्णालयाकडून उपचारांची कागदपत्रे मिळवली आहेत.

‎Akola News l शेगावच्या श्री गजानन महाराज पालखीचे 4 जूनला आगमन: श्री गजानन महाराज पालखी सत्कार समितीचा आढावा

विदर्भाची पंढरी म्हणून प्रख्यात शेगाव येथील संत श्री गजानन महाराजांचे पालखीचे आषाढीनिमित्त भजनी, दिंडी, अश्व, हत्ती आणि ७०० वारकऱ्यांसह बुधवारी, ४ जून रोजी सकाळी ७ वाजता अकोला येथे आगमन होत आहे. गेल्या ५ दशकांपासून येथील श्री गजानन महाराज शेगाव पालखी

या सभेत श्रींच्या पालखीचे स्वागत व रात्रीचा मुक्काम मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. उपस्थित सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी पालखीच्या दोन दिवसीय मुक्कामातील आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा मानस व्यक्त केला. तसेच गतवर्षी आलेल्या पालखी उत्सव खर्चाचा आढावा समितीचे कोषाध्यक्ष नारायण भाला यांनी उपस्थितांसमोर मांडला तसेच भाविक भक्तांना श्रींचे दर्शन व्हावे म्हणून अकोला शहराच्या मुख्य रस्त्याने श्रींच्या पालखीची शोभायात्रा काढण्याचे ठरवले. हरिभजनाचा लाभ व्हावा, समता बंधुभाव दृढ व्हावा यासाठी दुपारी ४ ते रात्री १२ पर्यंत मुंगीलाल बाजोरिया विद्यालय मैदानावर श्रींच्या दर्शनाची व्यवस्था केली आहे, तरी भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

या सभेला रामराव घाटे, उपाध्यक्ष प्रकाश खंडेलवाल, उपसचिव दिनेश पांडव, शोभायात्रा प्रमुख नारायणराव आवारे, बाबासाहेब गावंडे, केशव पाटील, अरविंद पाटील, रजनीकांत सप्रे, श्यामसुंदर मालपाणी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नवनिर्वाचित अध्यक्ष किशोर फुलकर यांनी तर आभार प्रदर्शन सचिव गजानन ढेमे यांनी केले.

सर्व अकोलेकरांनी श्रींच्या पालखीच्या ठिकठिकाणी स्वागताच्या तयारीस लागावे व शिस्तीचे पालन करावे. पालखीच्या मार्गाने पर्यायी मार्गाचा वापर करावा जेणेकरून पालखीला त्रास नाही व्हावे आणि भरपूर संख्येने दर्शनाचे, प्रसादाचे लाभ घ्यावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री गजानन महाराज संस्था प्रमुखांनी ठरवून दिलेल्या शहरातील मुख्य रस्त्यानेच शोभायात्रा निघणार आहे. सकाळी ११ वाजता श्रींची पालखी शंकरलाल खंडेलवाल विद्यालय गोडबोले प्लॉट, जुने शहर येथून निघेल. डाबकी रोड श्री विठ्ठल रुक्माई मंदिर, काळा मारुती मंदिर, सुशील बेकरी समोरून, लोखंडी पुलावरून, मोठा पूल, महानगरपालिका चौक, चांदेकर चौक, चिवचिव बाजार प्रवेशद्वारातून, स्वावलंबी विद्यालय समोरून, मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात पालखीचा मुक्काम राहील.

Vaishnavi Hagawane Case : असं माझ्यामागे लचांड लागतं… अजित पवारांच्या वक्तव्यानं हशा अन् प्रश्न विचारताच दादा मिडीयावरच भडकले

वैष्णवी हागवणेच्या मृत्यूवरून अजित पवार सध्या मिडीयावरच भडकत असल्याचे पाहायला मिळत आहे. बारामतीच्या एका कार्यक्रमात अजित पवारांच्या एका वक्तव्याने हशा पिकवला. त्यावरून कोल्हापूरात अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारताच दादांचा राग मिडीयावरच अनावर झाला. कोल्हापुरात बोलत असताना अजित पवारांनी आपला राग मिडीयावरच काढला आणि दादा एवढ्यावरच थांबले नाहीत तर मिडीयाचा धंदा काय हे ही फिक्स करून टाकलं. विषय वैष्णवी हागवणेच्या मृत्युचा होता. बारामतीच्या कार्यक्रमात अजित पवारांनी आपण लग्नाला जातो आणि मग लचांड मागे लागत असं वक्तव्य करून हशा पिकवला. कार्यकर्त्या हसले अजित पवारही हसले. कोटींच्या हुंड्यासाठी वैष्णवी हागवणेची सासरच्यांकडून हत्या झाल्याचा आरोप आहे. विषय एवढा गंभीर असताना अजित पवारांनी हशा पिकवल्याने कोल्हापूरात माध्यमांनी अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावरून अजित पवारांचा भडका उडाला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Vaishnavi Hagawane Case : सुनांना मारझोड करणाऱ्या हगवणेंचा आणखी एक उद्योग समोर, बैलासमोर नाचवलं गौतमी पाटीलला, VIDEO व्हायरल

पुण्याच्या वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणानंतर राज्यात एकच संताप व्यक्त केला जात आहे. सासऱ्यांच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणेनी स्वतःचा जीव दिला असल्याचा आरोप हगवणे कुटुंबावर केला जात आहे. या प्रकरणी तपास सुरू असताना आता हगवणे कुटुंबाचा आणखी एक उद्योग समोर आला आहे. घरातील सुनांना जनावराप्रमाणे वागणूक देणाऱ्या हगवणे कुटुंबानं एका जनावरासाठी खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. हगवणे कुटुंबाच्या एका लाडक्या बैलाचा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने एक खास आयोजन करण्यात आलं होतं. या बैलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला प्रसिद्धी नृत्यांगणा गौतमी पाटील हिला चक्क त्या बैलासमोर नाचवण्याचा उद्योग हगवणे कुटुंबाने केला. याच कार्यक्रमाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. याच कार्यक्रमावेळी स्टेजवर सुशील राजेंद्र हगवणे याचा फोटो आहे. सुशील हा वैष्णवीचा दीर आहे सध्या तो पोलिसांच्या अटकेत आहे.

राजकारणात माझे दोन गॉडफादर…’, बाळासाहेब आणि शरद पवारांचं नाव घेत छगन भुजबळांनी स्पष्टचं सांगितलं

छगन भुजबाल: राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात कमबॅक झाले आहे. छगन भुजबळ यांनी मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. छनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आले आहे. छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचा पदभार सोपवण्यात आला आहे. छगन भुजबळ यांना सुरुवातीला मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर त्यांनी नाराजी स्पष्ट केली होती. मात्र पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर छगन भुजबळांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. झी २४ तासच्या टु द पॉइंट या मुलाखतीत त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्रिमंडळ होऊन ८ महिन्यानंतर स्थान मिळालं याप्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं आहे. थांबावं लागतं, वाट पाहावी लागते. आपल्याच मनाप्रमाणे गोष्टी होतात असं नाही. थांबाव लागतंच. राजकारणत चालतंच. राजकारणातील सत्तापदे ही अळवावरची पाणी आहेत. ती कधी निसटून जातील ते काही सांगता येत नाही. त्यामुळं तयारीतच राहावं लागतं. आयुष्याचं सुद्धा असंच आहे तर तर या पदाचं काय घेऊन बसलात, असं उत्तर त्यांनी दिलं आहे.

राजकारणात माझे दोन गॉडफादर…

मी राजकारणात आलो तेव्हा काही माझे कोणी गॉडफादर नव्हते. माझे पहिले गॉडफादर बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे गॉडफादर शरद पवार. मी जेव्हा चांगलं काम केले. जीव तोडून काम केले तेव्हा बाळासाहेबांनी मला जवळ केले. कधीही चांगलं द्यायचे असेल तेव्हा बाळासाहेबांनी माझा विचार पहिले केला. मी पहिला आमदार झालो शिवसेनेतून. शिवसेनेचे सगळे उमेदवार पडले. एकटा छगन भुजबळ निवडून आला. नंतर महापालिकेते निवडणूक आली तेव्हा बाळासाहेबांनी भुजबळ तुम्ही उभे राहियचे सांगितले. मी उभा राहिलो आणि शिवसेनेने मुसंडी मारली आणि मी महापौर झालो. आमदार महापौर छगन भुजबळ पहिलाच, असं त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेना वाढवण्यासाठी गावागावातून काम केलं. मला कधी डावललं नाही. तीच गोष्ट काँग्रेसमध्ये आल्यानंतरही. 18 लोकांना घेऊन काँग्रेसमध्ये आलो तेव्हा कॅबिनेट मंत्री मी आणि दोन तीन लोकांना मंत्रीपदाची शपथ दिली. काँग्रेसने 10 दिवसांत मंत्रीपदाची शपथ दिली. काहीतरी नाव असेल काहीतरी इतिहास असेल ना पाठीमागे म्हणूनच महसूल मंत्रीपदाची शपथ दिली, असंही त्यांनी म्हटलं आहे.

1985 ला आमदार होतो तेव्हाही मी वन मॅन आर्मी होतो. काँग्रेसमध्ये विरोधीपक्ष नेता असताना जीवघेणा हल्ला झाला. खोट्या केसेसमध्ये अडकवले पण त्यातूनही मी बाहेर पडलो. त्यानंतर ऐनवेळेला निवणडुकीला सात आठ महिने असताना पवार साहेबांना काढलं आणि दोन काँग्रेस झाल्या. तेव्हा मी पवार साहेबांसोबत गेलो. तेव्हा तुम्हाला कल्पना असेलच सगळ्यांनी मला पवारसाहेबांसोबत जाऊ नका, असं सांगितलं. मी तेव्हा त्यांना सांगितलं मी पवारसाहेबांना नाही सोडणार आणि मी पवारसाहेबांसोबत राहिलो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

“झुडपी जंगल निर्णयाने विदर्भाला दिलासा: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे विकास प्रकल्पांना मार्ग मोकळा – मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर : गेल्या 45 वर्षापासून विदर्भाचा लढा चालला होता, येथील विकास थांबला होता, न्यायालयाने झुडपी जंगल बद्दल महत्त्वपूर्ण निर्णय देत विदर्भाला मोठा दिलासा दिला आहे. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme court) आभार मानतो, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी झुडपी जंगल निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. कारण, अभयारण्यासंदर्भातील कायद्यानुसार तेथील जमिनीवर विकासात्मक कामे करण्यासाठी कायदेशीर अडथळा येत होता. त्यामुळे, विदर्भातील झुडपी जंगल असलेल्या जमिनीवर विकासात्मक प्रकल्पाचे काम करणे शक्य नव्हते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत विदर्भाला मोठा दिलासा दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.

1996 पूर्वी ज्या जमिनी ग्रँड झाल्या आहेत, त्यांना एक्झम्पशन मिळालेलं आहे. तर, 1996 नंतर ज्या जमिनी ग्रँड झालेल्या आहेत, त्यासंदर्भात एक प्रक्रिया देण्यात आली आहे. त्या प्रक्रियेचा अवलंब करुन राज्य सरकार, केंद्र सरकारकडून त्या जमिनी मागू शकते. तसेच, झोपडपट्ट्यांना मालकी हक्क देण्याकरिता मान्यता देण्याचा निर्णय देखील सर्वोच्च न्यायालायने घेतला आहे. नागपूरमधील एकात्मता नगर, चुनाभट्टी, रमाई नगर या जागेवर झोपडपट्टी वसल्याने त्यांना मालकी हक्क देता येत नाही. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ती अडचण दूर झाल्याचे मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

सन 1960 मध्ये महाराष्ट्र तयार झाला आणि विदर्भ सीपी अँड बेरारपासून वेगळा होऊन महाराष्ट्रात दाखल झाला. मात्र, त्या वेळच्या महसुली रेकॉर्डमध्ये या जमिनीला जंगल लिहिण्यात आले होते. नंतर मध्य प्रदेशने आपला रेकॉर्ड सुधारला, मात्र महाराष्ट्रात त्याला झुडपी जंगल म्हटल्यामुळे 1980 च्या वन संरक्षण कायद्यात त्याला जंगल असेच संबोधण्यात आले. विदर्भाचा विकास थांबला होता, कारण नागपूर रेल्वे स्थानक, उच्च न्यायालय यांची इमारत ही जुन्या लँड रेकॉर्डनुसार ते झुडपी जंगलाच्या जागेवरच आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. विदर्भात सिंचन आणि विकासाचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात अडकले होते. सर्वोच्च न्यायालयाने 1996 पूर्वी देण्यात आलेल्या जमिनींना सूट दिली आहे आणि 96 नंतर देण्यात आलेल्या जमिनीबद्दल एक प्रक्रिया सांगितली आहे. त्या प्रक्रियेनुसार राज्य सरकार केंद्र सरकारकडून जमीन मागू शकते, असेही फडणवीस यांनी सांगितले.

संरक्षक वने तयार करावे लागणार

झोपडपट्ट्यांमधील झोपड्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासाठी सूट देण्याची मागणी आम्ही केली होती. ती पण सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. नागपुरात अशा अनेक झोपडपट्ट्या आहेत, त्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागातही झुडपी जंगलाच्या जमिनीवर बांधलेल्या घरांना नियमित करता येणार आहे. हा एक चांगला निर्णय आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. तर, 2014 ते 19 जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा एक समिती तयार करून आम्ही सर्वोच्च न्यायालयाला अहवाल सादर केला होता. सर्वोच्च न्यायालयाने तयार केलेल्या उच्च अधिकार समितीने सुद्धा राज्य सरकारचा अहवाल मान्य केला आहे. 45 वर्ष विदर्भातील सर्व पुढारी सातत्याने जी मागणी करत होते त्याला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने विकास आणि पर्यावरण संदर्भात समतोल साधला आहे. काही जमिनीवर आता आपल्याला संरक्षित वन तयार करावे लागणार आहे. त्यामुळे विकास आणि पर्यावरणाचा समतोल सर्वोच्च न्यायालयाने साधल्याचे मुख्यमंत्र्‍यांनी सांगितलं.

Gadchiroli : गडचिरोलीत मोठी कामगिरी: सी-60 च्या अभियानात 14 लाखांच्या इनामी 4 नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली : गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवानांनी मुसळधार पावसामध्ये भामरागडच्या घनदाट जंगलात अभियान राबवून 4 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या चारही नक्षलवाद्यांवर तब्बल 14 लाखांचे बक्षीस होते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. घटनास्थळावरुन एक एसएलआर रायफल, दोन 303 रायफल, आणि एक भरमार बंदूक असे चार बंदूक जप्त करण्यात आले आहेत. आताही घटनास्थळावर सर्चिंग ऑपरेशन सुरू असून पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे.

तास चाललेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा

गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांच्या सी- 60 च्या 12 तुकड्या आणि सीआरपीएफ 113 बटालियनची 1 तुकडी भामरागड तालुक्यातील गवंडे आणि नेलगुंडा परिसरातील इंद्रावती नदीच्या काठावर नक्षलविरोधी अभियान राबवत होते. घनदाट जंगल आणि पावसाचा सामना करत असताना शुक्रवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. जवळपास 3 तास चाललेल्या चकमकीत पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळावर सर्चिंग ऑपरेशन राबवले असता चार नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

सर्वांची ओळख पटली असून सन्नु मासा पुंगाटी, वय 35 वर्षे, रा. कवंडे, अशोक ऊर्फ सुरेश पोरीया वड्डे, वय 38 वर्षे, रा. कवंडे, करुणा ऊर्फ ममीता ऊर्फ तुनी पांडू वरसे, वय 21 वर्षे, रा. गोंगवाडा आणि विज्यो ऊर्फ विज्यो होयामी, वय 25 वर्षे, रा. पोडीया, असे मृतक नक्षलवाद्यांची नावे आहेत.

 

Nagpur : नागपूर बोगस शिक्षक घोटाळा: विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव वैशाली जामदार अटके

Nagpur Bogus Teacher Scam नागपूर :  राज्यभरात गाजत असलेल्या नागपूर जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी आणि बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता छत्रपती संभाजीनगर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांना  अटक करण्यात आलीय. नागपूर पोलिसांच्या एसआयटीने छत्रपती संभाजीनगर इथून त्याना ही अटक करण्यात आली असून त्यांना नागपुरात आणण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची व्याप्ती दिवसागणिक वाढत असल्याचे बोललं जात आहे. 

बनावट कागदपत्राचे आधारे अपात्र शिक्षकांना पदोन्नती देण्यास मान्यता

पुढे आलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय शिक्षण मंडळ सचिव पदावर कार्यरत असलेल्या वैशाली जामदार या उल्हास नरड यांच्या पूर्वी नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक होत्या. तपासा दरम्यान त्यांच्या कार्यकाळात नागपूर शिक्षण उपसंचालक कार्यालयाव्दारे बनावट कागदपत्राचे आधारे अपात्र शिक्षकांना पदोन्नती देण्यास मान्यता देण्याचा ठराव करण्यात आला आणि फेरबदल करुन शासनाची फसवणूक करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यावरून या घोटाळा प्रकरणी नियुक्त विशेष तपास पथकाने त्यांना हजर राहण्याची नोटीस दिली होती. दरम्यान, विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या निवासस्थान येथून त्याना ताब्यात घेतले होते. यानंतर कोर्टातून ट्रान्झिट रिमांड घेऊन त्यांना नागपूर येथे आणण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

नागपूरसह राज्यात गाजत असलेल्या शिक्षण विभागातील 580 शिक्षक भरती घोटाळ्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. नागपूर जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 580 शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्त करण्यात आल्याचा काळाबाजार उघड झाला आहे. दरम्यान,  या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली असून प्रशासनाला कारवाईचे सक्त आदेश देण्यात आलेले आहे. बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करुन सरकराला कोट्यवधीची चुना लावण्यात आल्याचे उजेडात आले आहे.

बोगस शिक्षकांशी संबंधित शालार्थ आयडी म्हणजेच त्यांचा वेतन देण्यासाठीच्या संगणिकृत प्रक्रिये संदर्भात अनेक डिव्हाईस (डेस्कटॉप कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल फोन) वेगवेगळ्या लोकेशन्सवरून वेगवेगळ्या आयपी ऍड्रेसद्वारे वापरले गेल्याचे दिसून येत आहे. तर मोठ्या संख्येने वेगवेगळे लोकेशन्स किंवा आयपी ऍड्रेस किंवा डिवाइस वापरले गेल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. त्यामुळे सायबर सेल समोर या घोटाळ्याचा तपास करणं एक मोठं आव्हान होऊन बसले आहे. या प्रकरणी एकट्या नागपूर विभागात झालेल्या 580 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. तर प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे बोगस शिक्षकांच्या बँक खात्यात पगार जमा झाल्याच्या नोंदीही आता पोलीस तपासणार असल्याची माहिती आहे.